Truth Of Sita Agnipariksha | का दिली सीतेने ‘अग्निपरीक्षा’ | हिंदूनी वाचायला हवी रामायणाची ही सत्यता 2023

Truth Of Sita Agnipariksha | रामायण आतापर्यंत अनेकांनी वाचले असेल पाहिले असेल. पण रामायणाचा शेवट कोणाला विचारला तर फार जणांना तो माहीत नाही किंवा पटत नाही. पतिव्रता असलेल्या सीतेला रामाने अग्निपरीक्षा का द्यायला लावली ? मग त्या प्रेमाला अर्थ काय? रावणाकडून सीता आणण्याचा अर्थ तरी काय? असे अनेक जणांना वाटते. पण अग्निपरीक्षेमागील सत्यता ही काही वेगळीच आहे. जर तुम्ही तुलसीदास यांनी लिहिलेले ‘रामायण’ वाचले असेल तर तुम्हाला या मागील सत्यता माहीत असेल. पण आजही असे अनेक जण आहेत ज्यांना या मागील सत्यता अजिबात माहीत नाही. आज आपण Storyus च्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत.

SWAMI SAMARTH TARAK MANTRA 2023 | श्री स्वामी समर्थ- कथा, तारकमंत्र प्रत्येकाने करावा पाठ

सीता हरण आणि रावण वध

माता सिता ही साक्षात लक्ष्मीचे रुप आहे. तर प्रभू श्री राम हे विष्णूचा अवतार आहे. राक्षसकुळातील रावणाने शंकराला प्रसन्न करुन सर्वकला निपुण आणि आपल्या शक्तीसाठी अनेक वर मागून घेतले होते. पण त्याचा उपयोग करुन तो देवकुळाला त्रास देत होता. त्याने देवांना बंधिवासात टाकले होते. त्यांना सळो की पळो करुन सोडले होते. तो आपल्या शक्तीने इतका उन्मत्त झाला होता की, त्याचा शेवट हा अनिश्चित होता. पण ब्रम्हदेवांनी दिलेल्या वरानुसार त्याला देवांपैकी कोणाकडूनही मरण येेणे शक्य नव्हते. त्यावेळी सगळ्या देवांनी विष्णू देवाकडे धाव घेतली. त्यावेळी विष्णू देवांनी मी राम रुपात जन्म घेईन आणि रावणाचा वध करीन असे सांगितले होते. (रामायण)

त्यानुसार अयोध्येचा राजा दशरथ आणि त्यांची राणी कौसल्या हिच्या पोटी राम जन्मला. प्रभू राम हे रावणाचा वध करण्यासाठी आणि रामायण घडवण्यासाठीच जन्माला आले होते. ही भविष्यवाणी आधीच झाली होती. त्यानुसार वाल्याचा वाल्मिकी झाला. त्यांनी रामायण लिहिले. ज्यांनी ज्यांनी हे रामायण पाहिले त्या सगळ्यांनी आपआपल्या भाषेत रामायणाची रचना केली.

सीतेचे हरण होणार ही गोष्ट प्रभू रामचंद्रांनाही माहीत होती. वनवासात असताना सीतेचे मोहक रुप पाहून अनेकांनी तिला त्रास दिला. त्यातच एकदा संधी साधून रावण हा तिचे हरण करण्यासाठी येणार याची कल्पना होती.

LORD SHRI RAM NAMES BOYS 25 + | मर्यादापुरुषोत्तम राम वरुन मुलांची नावे

अग्निदेवाकडून केली मागणी Sita Agnipariksha

सीता अग्निपरीक्षा ( Sita Agnipariksha)

वनवासाच्या शेवटच्या काही वर्षात असताना रावणाची बहीण शूर्पणखा ही शंबरी नावाच्या तिच्या पुत्राच्या मृत्यूमुळे संतप्त झाली होती. त्याला मारणारा अन्य कोणी नाही तर रामाचा भाऊ लक्ष्मण होता हे कळताच ती त्या वनात आली. तिने लक्ष्मणाला आपल्या जाळात ओढण्याचा प्रयत्न केला. पण रामांनी तिचा डाव ओळखला. लक्ष्मणाला त्याची माहिती दिली. लक्ष्माणे तिचे कान आणि नाक कापून टाकले. त्यामुळे सुंदर असलेली शूर्पणखा विद्रूप दिसू लागली. त्यानंतर तिने राम -लक्ष्मणासोबत युद्धही केले. पण ते काही कामी आले नाही. तिने रावणाची मदत घेण्याचे ठरवले. रावणाने आपला बदला घ्यावा यासाठी तिने चार गोष्टी अधिकच सांगितल्या. सीतेच्या रुपाचे वर्णन केले. लंकेत अशा सुंदर स्त्रीची गरज आहे असे सांगून तिने सीताहरणासाठी रावणाला तयार केले.

सीताहरणाचे संकट जवळ येणार हे माहीत होते. म्हणूनच सीतेचे पावित्र्य जपून ठेवण्यासाठी प्रभू रामांनी अग्निदेवतेकडे खरी सीता सुखरुप ठेवण्यासाठी दिली आणि अग्निदेवतेला छाया सीता देण्यास सांगितले. त्यानुसार अग्नितून छाया सीता ही बाहेर आली.

अपहरण छाया सीतेचे

छाया सीतेचे अपहरण

रावण काहीतरी कपट करुन सीतेचे अपहरण करणार याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच रावणाने कस्तुरी मृगाचे कपट तयार करुन वैराग्याचे जे रुप धारण करुन सीतेचे हरण केले. ती सीता मुळात सीता नव्हती. तर ती छाया सीता होती. रावणासारख्या राक्षसाकडे राहिल्यामुळे तिचे पावित्र्य नष्ट होईल आणि तिच्याविषयी प्रश्न विचारले जातील. त्यामुळे तिची प्रतिष्ठा टिकून ठेवण्यासाठीच अग्निदेवतेकडे छाया सीतेची मागणी करण्यात आली होती. सीतेचेच रुप असल्यामुळे तिला कोणीही ओळखले नाही. ती छाया सीता आहे याची कोणालाही जाणीव झाली नाही.Sita Agnipariksha

आता प्रश्न असा पडेल की, मग सीतेला रामांनी अग्निपरिक्षा का द्यायला लावली. ही अग्निपरीक्षा नव्हतीच. सगळ्यांसमोर अग्निला अग्नीतून आलेली छाया सीता ही परत देण्यात आली. अग्नितून शुद्ध होऊन सीता आली असाही काहींचा समज झाला. पण अग्निलाही जिचे पावित्र्य माहीत होते अशी ही माता सीता म्हणजे साक्षात लक्ष्मीचे रुप. तिला कसली अग्निपरीक्षा. तिचे पावित्र्य कधीही नष्ट होणारे नाही. मग कितीही रावण आले असले तरी हे शक्य झाले नसते.

FAQ’S

सीता अग्निपरीक्षा Sita Agnipariksha वादातित का?

रामायणातून बरेच काही घेण्यासारखे आहे. पण रामायणाचा शेवट म्हणजेच रावणाचा वध आणि सीतेची सुटका ही कितीही आनंदाची असली तरीदेखील सीतेला अग्निपरीक्षा का द्यायला लावली? हा प्रश्न अनेकांना पडतो. पण याचे खरे कारण आज आपण जाणून घेतले आहे. सीता हरण आणि रावणाचा वध हा अगदी ठरलेला होता. त्यामुळेच अग्निदेवाकडे खऱ्या सीतेला ठेवून छाया सीता ही अग्नितून मागून घेतली होती. त्याच सीतेचे हरण झाले होते. खरी सीता ही अगदी सुरक्षित होती.

सीता अग्निपरीक्षेच्या सत्यतेचा अनेक ठिकाणी उल्लेख का केला जात नाही?

ज्यांनी रामायण पाहिले त्यांनी रामायण लिहिले. वाल्मिकी ऋषी, तुलसीराम यांचे रामायण हे सर्वाधिक मानले गेलेले रामायण आहे. याशिवाय रामायणाशी निगडीत ज्या ज्या कथा आल्या आहेत. त्या सगळ्यांमध्ये छाया सीतेचे उल्लेख करण्यात आलेला आहे. आता त्याबद्दल फार काही लिहिलेले नाही. पण ज्यांनी रामायण अगदी व्यवस्थित वाचले आहे. त्या सगळ्यांना ही गोष्ट माहीत आहे. पण ज्यांना रामायण वर वर माहीत असेल त्यांना या गोष्टी नक्कीच कळणार नाहीत. त्यासाठी रामायणाचा अभ्यास योग्य हवा.

अधिक वाचा

RAMAYAN KATHA | रावण जन्माची कथा | रामायण कथासार कथा 2, प्रत्येकाने वाचावी अशी सत्यकथा
RAMAYAN KATHA | असा झाला वाल्याचा ‘वाल्मिकी’ | रामायण कथासार मराठी -1 आरंभ

Leave a Comment