Kaliyug Facts सामान्य भाषेत आपण अनेकदा भयानक कलियुगाबद्दल बोलतो. जगात वाढत जाणारे पाप किंवा गुन्हेगारी पाहून लोक कलियुगाच्या टोकाच्या मर्यादांबद्दल बोलतात. सध्या आपण कलियुगात वावरत आहोत आणि रोज आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे पाप घडताना दिसून येत आहे. विचारही करता येणार नाही असे गुन्हे घडत आहेत. अनेकदा विचित्र घडामोडी घडत आहेत तर अनेक ठिकाणी अचानक भूकंप, त्सुनामी अथवा युद्धात अनेकांचे जीवही जाताना दिसून येत आहेत.
आजच्या जगात तुम्हाला अनेकदा लोक असे म्हणताना आढळतील की, मला माहीत नाही! कलियुग कधी संपेल? चला, कलियुगाच्या शेवटच्या रात्रीबद्दल विष्णू पुराणात काय लिहिले आहे ते आपण जाणून घेऊया.
Shivling: वैशाख येताच शिवलिंगावर का चढवला जातो कलश, समुद्र मंथनाशी संबंधित कथा
कलियुगातील शेवटची रात्र कशी असेल?
कलियुगाचे सर्व टप्प्यांबाबत विष्णू पुराणात लिहिले आहे. विष्णू पुराणातील भविष्यवाणीनुसार, जेव्हा कलियुग त्याच्या अंतिम टप्प्यात पोहचेल आणि त्याची शेवटची रात्र असेल, तेव्हा प्रत्येक रात्र पूर्वीपेक्षा जास्त गडद असेल. याचा अर्थ कलियुगाच्या रात्री अनेक पापं आणि गुन्हे वाढतील. लोक तुमच्या डोळ्यासमोर दिसणाऱ्या गोष्टींबद्दलही तुम्हाला उघड उघड खोटे बोलतील. त्याच वेळी, कलियुगातील शेवटची रात्र सर्व रात्रींपैकी सर्वात मोठी असेल. कलियुगातील शेवटची रात्र इतकी काळोखी असेल की दिवा लावला तरी पुरेसा प्रकाश मिळणार नाही. लोक अस्वस्थ होऊन ही रात्र जाण्याची वाट पाहत असतील पण सर्वत्र विनाशाची चिन्हे दिसतील आणि सर्व वाईटच घडेल
शेवटच्या रात्री दिसेल रौद्र रूप
कलियुगाच्या शेवटच्या रात्री, निसर्ग अस्थिर होईल. मुसळधार पावसामुळे पृथ्वीवर सर्वत्र पाणीच पाणी होईल. संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली गेलेली दिसेल. मुसळधार पाऊस आणि वादळांमुळे संपूर्ण पृथ्वीवर विनाश होताना दिसेल. माणसाच्या हृदयाचे ठोके वाढतील. कलियुगाची शेवटची रात्र इतकी दीर्घ असेल की ती एका वर्षाची वाटेल. लोकांना काहीही कळणार नाही आणि सगळीकडे केवळ हाहाःकार माजलेला असेल.
आजारांनी ग्रस्त
कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात, लोक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या इतके कमकुवत होतील की त्यांच्यात शारीरिक श्रम करण्याची क्षमता राहणार नाही. लोक मानसिकदृष्ट्या इतके कमकुवत होतील की कठोर शब्द ऐकून ते अस्थिर होतील. कलियुगाच्या शेवटच्या रात्री, जेव्हा सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असेल, तेव्हा लोक पळून जाण्याचा प्रयत्नही करू शकणार नाहीत कारण त्यांच्यात ताकद उरणार नाही. एकंदरीतच शेवटच्या रात्री प्रत्येकाच्या डोळ्यासमोर त्याचा मृत्यू दिसेल आणि काहीही करण्याची ताकद त्यांच्यात उरणार नाही.
होईल अन्नान् दशा
कलियुगाच्या शेवटच्या रात्री अन्नटंचाई असेल. पाऊस, भूकंप आणि वादळामुळे, गोदामांमध्ये साठवलेले बहुतेक अन्नधान्य वाहून जाईल आणि उर्वरित अन्नधान्य वापरण्यायोग्य राहणार नाही. कलियुगाच्या शेवटच्या रात्री, लोक भूक आणि तहानेने व्याकूळ झालेले दिसतील. उपासमारीमुळे लोकांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होऊ लागेल. लोकांमध्ये राग आणि भीती यासारख्या नकारात्मक भावना निर्माण होऊ लागतील आणि लोकांची अन्नानदशा झालेली दिसून येईल आणि सगळीकडे केवळ दुःख असेल.
टीप – या लेखात नमूद केलेले उपाय/फायदे/सल्ला आणि विधाने केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. Storyus.in या लेखातील वैशिष्ट्यांमध्ये लिहिलेल्या गोष्टींना समर्थन देत नाहीत. या लेखात असलेली माहिती विविध स्रोत/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/श्रद्धा/धार्मिक ग्रंथ/दंतकथा यातून गोळा केली आहे. वाचकांना विनंती आहे की त्यांनी लेखाला अंतिम सत्य किंवा दावा मानू नये आणि त्यांचा विवेक वापरावा. Storyus.in हे अंधश्रद्धेच्या विरोधात आहेत.