गणपती बाप्पाच्या गोष्टी मराठी | Ganpati Bappa Gosti Marathi 5

Ganpati Bappa Gosti Marathi | लाडक्या बाप्पाच्या गोष्टी ऐकायला आणि वाचायला आपल्या सगळ्यांनाच आवडतात. लाडक्या बाप्पाच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. लहान मुलांपर्यंत तर या गोष्टी नक्कीच जायला हव्यात. आपला बाप्पा कसा आहे हे जाणून घेताना त्याच्या लिला, त्याच्या खोडी आणि त्याचा पराक्रम हा आपल्याला माहीत हवा की नाही. लाडक्या बाप्पाला हत्तीचे मुख का आहे? त्याला गजानन का म्हणतात? सगळ्या देवांमध्ये आधी लाडक्या बाप्पाचे नाव का घेतले जाते? या सगळ्याची माहिती यातून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मग चला जाणून घेऊया बाप्पाच्या अशा मस्त मस्त कथा. (गणपती बाप्पाच्या गोष्टी)या शिवाय तुम्ही अधिक मास संपूर्ण माहिती घ्यायला विसरु नका.(Ganpati Bappa Gosti Marathi )

HARTALIKA | हरतालिकेची संपूर्ण माहिती, कथा आणि पूजाविधी | 2023

लाडक्या बाप्पाचा जन्म

लाडक्या बाप्पाचा जन्म | Ganpati Bappa Gosti Marathi

बाप्पाचा जन्म कसा झाला? ही गोष्ट तर तुम्ही तुमच्या मुलांना सांगायलाच हवी. आजही अनेकांना याची खरी कथा माहीत नाही. विशेषत:या काळात मुलांना आपल्या पौराणिक गोष्टी फारच कमी माहीत असतात.

एकदा माता पार्वती आंघोळीसाठी स्नानघरात जात होती. त्यावेळी ती तेेथे एकटी होती. स्नानाला जाण्यापूर्वी तिने आपल्या शरीराच्या मळाने एक लहानसा मुलाची मूर्ती बनवली आणि त्यात प्राण आणले. त्या लहान मुलाचे नाव माता पार्वतीने ‘गणेश’ असे ठेवले. तिने त्या पुत्राला ‘मी स्नानगृहात स्नान करण्यास जात आहे.इथे कोणीही आले तरी त्याला आत पाठवू नकोस’ असे सांगून माता पार्वती आत स्नान करण्यास निघून गेली.

थोड्याच वेळाने तेथे भगवान शंकर आले. त्यांनी स्नानगृहात जाण्याचा प्रयत्न केला. ते आत जाताना पाहून द्वारापाशी थांबलेल्या गणेशाने भगवान शंकरांना रोखले. ‘तुम्ही आत जाऊ शकत नाही. आता माता आंघोळ करत आहे. तिने आत कोणासही येण्यास नकार दिला आहे.’ ते ऐकून भगवान शंकरांनी त्या लहान बालकाला ‘मी माता पार्वतीचा पती असून मला आत जाऊ दे’ असे सांगितले. पण माता पार्वतीच्या आज्ञेपुढे त्याला काहीही महत्वाचे नव्हते. त्याने भगवान शंकराची वाट रोखून धरली. आपला असा अपमान करतो हे पाहून भगवान शंकर क्रृद्ध झाले. त्यांनी त्या बालकाचे शीर उडवले. ते आत स्नानगृहात गेले. Ganpati Bappa Gosti Marathi

त्यांना स्नानगृहात आलेले पाहून माता पार्वती चिडली. ती भगवान शंकरांना म्हणाली,’ मी दरवाज्यापाशी एका बालकास उभे केले आहे. त्याला मी कोणालाही आत पाठवू नको. असे देखील सांगितले होते. ते ऐकून भगवान शंकर म्हणाले,’ त्या बालकाला मी समजावून सांगितले पण तो मला आत येऊ देत नव्हता. त्यामुळे मी त्याचे शीर धडापासून वेगळे केले आहे.

हे ऐकून माता पार्वती चांगलीच संतापली. तिने रौद्र असे रुप धारण केले. तिने भगवान शंकराकडे जळजळीत कटाक्ष टाकला आणि आपल्या पुत्राला जिवंत करा अन्यथा मी बाहेर येणार नाही असे सांगितले. तिने धारण केलेल्या रौद्ररुपामुळे सारी सृष्टी डळमळू लागली. तिची समजूत घालण्यासाठी समस्त देवगण आले. भगवान शिव तिला समजावू लागले. पण तिने कोणाचेही ऐकले नाही. तिने पुत्र जिवंत करा असा हट्ट धरला. त्यावेळी भगवान शंकरांनी विष्णूंकडे अशा मुलाचे शीर घेऊन या ज्याची आई त्याच्याकडे पाठ करुन झोपली असेल असे सांगितले. (Ganpati Bappa Gosti Marathi )

भगवान विष्णूंनी गरुडाला आदेश दिला. मुलाचे शीर शोधण्यासाठी त्यांनी पृथ्वी पालथी घातली. पण त्यांना कोणाचेच शीर सापडेना. शेवटी त्यांना एक हत्तीण दिसली. जी आपल्या पिल्लाकडे पाठ करुन झोपली होती. त्या पिल्लाचे शीर घेऊन गरुड यांनी विष्णूकडे दिले. विष्णूंनी ते महादेवांना दिले. आपल्या शक्तीने त्यांनी त्या बालकाला हत्तीचे शीर लावून जिंवत केले. त्याला जिवंत पाहून माता पार्वती शांत झाली.

इतकेच नाही तर पुन:जन्मलेल्या त्या लाडक्या बालकाला खास आशीर्वाद ही देण्यात आले. कोणत्याही शुभकामाची सुरुवात करण्यापूर्वी अग्रस्थानावर तुझे नाव असेल. कोणत्याही कार्यात सगळ्यात आधी पूजा करण्याचा मान असेल असा आशीर्वाद देण्यात आला. म्हणूनच आपल्याकडे कोणत्याही कार्याची सुरुवात ही बाप्पाच्या पूजेनेच होते.

बाप्पाचे वाहन मुषक

Ganpati Bappa Gosti Marathi गणपती बाप्पा गोष्टी

प्रत्येक देवाचे आपले असे वाहन आहे. पण बाप्पाचे वाहन एकदम खास आणि सगळ्यात वेगळे आहे. कारण छोटासा उंदीर हा बाप्पाचे वाहन आहे. म्हणूनच आपण उंदीर मामा असे त्याला आदराने संबोधतो. अशा या उंदीरमामाच्या वाहनाची कहाणीही पुराणात सांगितली जाते. पुराणात बाप्पाचे वाहन मुषक का आहे यासाठी एक कथा सांगितली जाते ती पुढील प्रमाणे

पौराणिक दाखल्यानुसार अशी कथा सांगितली जाते की, भगवान इंद्राच्या इंद्रलोकात अनेक अप्सरा या नृत्य सादर करुन इंद्राचे मनोरंजन करी. त्या दरबारात कौंच नावाचा एक गंधर्व होता. तो दरबारातील अप्सरांसोबत कायम मस्करी करत असे. त्यांच्यासोबत गप्पा मारत असे ते पाहून एकदा इंद्रदेवाला खूप राग आला. त्याने त्याला श्राप दिला तू उंदीर होशील. तो गंधर्व एक बलवान उंदीर बनून पृथ्वीवर पराशर ऋषींच्या आश्रमात गेला. त्या आश्रमात जाऊन त्याने सगळा आश्रम उद्धवस्त केला. त्या उंदराला आवरणे हे आश्रमातील कोणालाच जमेना. त्यावेळी पराशर ऋषी हे गणेशाकडे केले. त्यांनी झालेला सगळा प्रकार सांगितला आणि या उंदरापासून सुटका करण्याची प्रार्थना केली. Ganpati Bappa Gosti Marathi

ते ऐकून भगवान गणेशांनी पाताळलोकात गेेलेल्या त्या उंदराला पकडले आणि सर्वांसमक्ष उभे केले. त्याच्या गळ्याला बांधलेला फास इतका घट्ट होता की, त्यामुळे त्याला चक्कर आली. त्याला ज्यावेळी जाग आली त्यावेळी तो गणपतीची मनधरणी करु लागला. त्याला आळवू लागला. त्याला त्याची चूक लक्षात आली हे पाहून बाप्पा खूश झाले आणि त्याने त्यास वरदान मागण्यास सांगितले. पण त्या त्या उंदराचा अहंकार काही कमी नव्हता. त्याने बाप्पालाच सांगितले, ‘मला काहीही नको. तुम्हीच माझ्याकडे काहीतरी मागा’

त्याचा तो अहंकार पाहून गणपतींना फार राग आला. त्याला अद्दल घडवण्यासाठी त्याने त्या मुषकाला ‘माझे वाहन हो’ असे सांगितले. त्याने जसे तथास्तु म्हटले तसे गणपती त्यावर जाऊन बसले. त्याच्या वजनामुळे उंदराला श्वास ही घेता येईना. त्याला त्याची चुकी कळली. त्याने माफी मागत ‘मला तुमचे वजन उचलण्याइतके बलवान करा’ असा आशीर्वाद मागितला. त्या दिवसापासून मुषक हे गणेशाचे वाहन आहे.

पृथ्वीची परिक्रमा

गणेश पुराणारात पृथ्वी परिक्रमेची कथा ही देखील आवर्जून सांगण्यासारखी आहे. मुलांवर चांगले संस्करा रुळण्यासाठी ही कथा अगदी उत्तम आहे.

एकदा काही देव आपली समस्या घेऊन भगवान शंकरांकडे आले. त्यावेळी त्यांच्यासोबत माता पार्वती, गणेश आणि कार्तिकेय देखील बसले होते. भगवान शिवांनी आपल्या दोन्ही मुलांकडे पाहून विचारले यांच्या समस्यांचे तुमच्यापैकी कोण निवारण करु शकेल? त्यावेळी गणेश आणि कार्तिकेय या दोघांनी आपण सक्षम असल्याचे सांगितले. Ganpati Bappa Gosti Marathi

त्यांचा तो आत्मविश्वास पाहून भगवान शिवांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. भगवान शिव म्हणाले, ‘जो सगळ्यात आधी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करुन येईल. तो हे कार्य करण्यास सक्षम आहे असे मी समजेन. शंकराची आज्ञा मानून कार्तिकेय मोरावर बसून पृथ्वीच्या परिक्रमेसाठी निघून गेला. पण गणेश मात्र तिथेच होता. त्याने विचार केला या उंदरावर बसून पृथ्वीची परिक्रमा मी काही जिंकू शकणार नाही. त्याने थोडासा विचार केला. शंकर पार्वती जेथे बसले होते त्यांच्याभोवती सात फेऱ्या मारुन त्याने आपली पृथ्वी परिक्रमा पूर्ण केली. दुसरीकडे कार्तिकेय आपली पृथ्वी परिक्रमा करुन आल्यानंतर मी विजेता असल्याचे सांगितले. त्यावेळी भगवान शंकरांनी गणेशाला पृथ्वी परिक्रमा न करण्याचे कारण विचारले. त्यावेळी तो म्हणाला की, आई-वडिलांच्या चरणीच समस्त पृथ्वी सामावली आहे. तर परिक्रमेची गरज काय? Ganpati Bappa Gosti Marathi
गणेशाचे ते बोलणे ऐकून त्यांना आनंद झाला. देवांवरील संकट निवारणाची जबाबदारी ही भगवान गणेशांकडे देण्यात आली. जो कोणी चर्तुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा करेल आणि रात्री चंद्राला अर्घ्य देईल त्याची सगळ्या दु:खातून मुक्ती होईल.

गणपतीला दुर्वा प्रिय

गणपतीला दुर्वा प्रिय

गणपतीला दुर्वा हा अगदी आवर्जून वाहिला जातो. दुर्वा हे साधे गवत आहे. पण त्याला गणपतीच्या चरणी खूप मोठा मान आहे असे का? याचा आपण कधी विचार केला आहे का? तर गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्यामागेही काही खास कारण आहे. कारण या मागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. (Ganpati Bappa Gosti Marathi )

पौराणिक कथेनुसार अनलासुर नावाचा एक दैत्य होता. त्या दैत्याने पृथ्वीवर हाहाकार माजवला जातो. तो ऋषीमुनी आणि सामान्य माणसांना खाऊन टाकत होता. त्याच्या जाचाला कंटाळून सगळ्या ऋषींनी भगवान शंकराकडे धाव घेतली. त्यांना अनलासुरबद्दल सांगितले. भगवान शंकराला त्याचा वध करण्याची विनंती देखील केली. त्यावर भगवान शंकर म्हणाले,’या राक्षसाचा वध करण्यासाठी गणेश योग्य आहे’ भगवान शंकराची आज्ञा घेऊन अनलासुराला मारण्यासाठी गणेश बाहेर पडला. त्याने अनलासुराला गिळून टाकले. अनलासुराला गिळल्यामुळे गणेशाच्या पोटात दाह होऊ लागला.

हा दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी 21 दुर्वा एकत्र करुन त्या बाप्पाला खाण्यास दिल्या. त्या दुर्वा खाऊन बाप्पाला आराम पडला. त्या दिवसापासून बाप्पाच्या पुजेमध्ये दुर्वाचे एक खास स्थान आहे. विशेषत: गणपतीला अनेक ठिकाणी 21 दुर्वाच वाहिल्या जातात.

गणपतीला मोदक प्रिय | Ganpati Bappa Gosti Marathi

Ganpati Bappa Gosti Marathi बाप्पाला का आवडतात मोदक

Ganpati Bappa Gosti Marathi गणपती बाप्पाला मोदक प्रिय आहेत हे आपण जाणतो. म्हणूनच आपण सगळे त्यांना ११,२१,५१ मोदकांचा नैवैद्य दाखवतो. मऊ लुसलुशीत असे मोदक हे आपल्यापैकी अनेकांचेही प्रिय असतील. पण गणपतीच्या नैवेद्यामध्ये याचा मान का आहे ते जाणून घेण्यासाठी ही कथा नक्की वाता.

ही कथा आहे माता अनुसयाची. एकदा माता अनुसयेने माता पार्वती, भगवान शिव आणि गणेश यांना आपल्या घरी जेवणास बोलावले. भगवान गणेशाचे काही केल्या पोट भरेना. माता अनुसया गणेशाला जे जे खाण्यासाठी आणत होती. ते अगदी काहीच क्षणात भगवान गणेश संपवत होते. त्यामुळे माता अनुसया चिंतेत पडली. भगवान गणेशाचे पोट भरण्यासाठी काय करावे असा प्रश्न त्यांना पडला. त्यावेळी त्यांनी गणेशांना काहीतरी गोड दिले तर त्यांचे पोट भरेल असे वाटले. असा विचार करुन माता अनुसयनेने ठान लुसलुशीत असे मोदक बनवले आणि ते गणेशांना दिले. ते मोदक खाऊन गणेशांचे पोट भरले. त्या दिवसापासून जर गणेशाला तृप्त करायचे असेल तर त्याच्या आवडीचे मोदक पानात वाढण्याची पद्धत सुरु झाली.

गणेश पुराणातील या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या नक्की कळवा.

डिलीव्हरीनंतर असे करा वजन कमी

Leave a Comment