Ramayana Story: अयोध्या नाही तर ‘या’ राज्याची राजकुमारी होती रामाची मोठी बहीण, वाचा पौराणिक कथा  

हिंदू धर्मात रामायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि हे महत्त्व कोणीच कमी करू शकत नाही. रामायणात काव्य रूपात मुख्यत्वे भगवान विष्णूच्या प्रभू राम अवताराबाबात अधिक माहिती मिळते. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणात सांगितल्यानुसार राजा दशरथाला 4 पुत्र असून राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न होते. पण रामाला बहीणही होती हे फारच कमी लोकांना माहीत आहे. हो हे खरं आहे आणि याचा उल्लेख नक्की कोणत्या पुस्तकात आहे अथवा रामाची बहीण कुठे होती याबाबत अधिक माहिती आपण या लेखातून घेऊया. 

कोण होती रामाची बहीण?

आज आपण जाणून घेऊया रामाची बहीण शांता हिच्याबाबत. शांता ही राजा दशरथ आणि कौशल्या यांची पहिली पुत्री होती, जी चारही भावांपेक्षा सर्वात मोठी होती. कथेत सांगितल्यानुसार, एकदा कौशल्याची मोठी बहीण वर्षिणी आणि तिचे पती अंग देशाचे राजा रोमपद अयोध्येला आले होते. कौशल्याची मोठी बहीण वर्षिणीला कोणतीही संतानप्राप्ती झाली नव्हती आणि याच कारणाने ती अत्यंत उदास होती. हे पाहून कौशल्याने आपली मुलगी शांता ही आपल्या बहिणीला दत्तक दिली. शांताला आपली पुत्री म्हणून वर्षिणीने स्वीकारले आणि पतीसह ती आपल्या देशात परतली. पुढे शांता अंग देशाची राजकुमारी झाली. 

Akshaya Tritiya: अक्षय तृतीयेच्या दिवशी करा ‘या’ गोष्टींचे दान, कष्ट होतील दूर

कशी होती शांता 

शांताचे वर्णन पौराणिक कथेत सांगितल्यानुसार लहानपणापासूनच शांता ही अत्यंत बुद्धीमान आणि सुंदर होती. तसंच तिच्यामध्ये त्याग, समर्पण, विनम्रता आणि आई-वडिलांचा सन्मान करणे हे अत्यंत चांगले गुण होते. विवाह झाल्यानंतर शांताने आपला पतिव्रता धर्मही अत्यंत निष्ठेने निभावला आणि कथेत सांगितल्याप्रमाणे शांता धार्मिक आणि कौटुंबिक मूल्य जपणारी असून याचे मोठे प्रतीक होती. 

कोणाशी झाली होती विवाहबद्ध?

रामाची मोठी बहीण शांताचा विवाह हा ऋषी श्रृंग यांच्यासह झाला होता, जे विभांडक ऋषीचे पुत्र होते. ऋषी श्रृंग यांनी राजा दशरथ यांच्यासाठी पुत्रोशती यज्ञ केला होता, ज्यामुळे राजा दशरथ यांना रामासह 4 पुत्रांची प्राप्ती झाली होती.

कथेनुसार, एकदा राजा रोमपदाच्या राज्यात दुष्काळ पडल्याने हाहाःकार माजला होता. तेव्हा राजा रोमपद यांनी ऋषी श्रृंग यांच्याकडून मदत मागितली. ऋषिने पाऊस पडण्यासाठी एका यज्ञाचे आयोजन केले आणि त्यानंतर दुष्काळातून मुक्तता मिळाली होती. तेव्हा राजाने प्रसन्न होऊन ऋषी श्रृंग यांच्यासह आपली पुत्री शांता हिचा विवाह करून दिला.  

Hanuman Jayanti 2025: हनुमानाने का घेतला होता पंचमुखी अवतार? प्रत्येक मुखाचे काय आहे महत्त्व?

टीप – या लेखात नमूद केलेले उपाय/फायदे/सल्ला आणि विधाने केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. Storyus.in या लेखातील वैशिष्ट्यांमध्ये लिहिलेल्या गोष्टींना समर्थन देत नाहीत. या लेखात असलेली माहिती विविध स्रोत/ज्योतिषी/पंचांग/प्रवचन/श्रद्धा/धार्मिक ग्रंथ/दंतकथा यातून गोळा केली आहे. वाचकांना विनंती आहे की त्यांनी लेखाला अंतिम सत्य किंवा दावा मानू नये आणि त्यांचा विवेक वापरावा. Storyus.in हे अंधश्रद्धेच्या विरोधात आहेत.

Leave a Comment